हृदय निरोगी ठेवणारे आहाराचे 8 नियम

हृदय निरोगी ठेवणारे आहाराचे 8 नियम: आपलं हृदय म्हणजे आपल्या शरीराचा इंजिनच आहे. इंजिन चालू नसेल तर गाडी पुढे जात नाही, तसंच हृदय थांबलं की सगळं थांबतं. म्हणून हृदयाचं आरोग्य सांभाळणं खूप गरजेचं आहे.

आजकाल चुकीच्या खाण्यापिण्यामुळे, ताण-तणावामुळे, बसून राहण्याच्या सवयींमुळे हृदयाचे आजार वाढलेत. पण थोडं लक्ष दिलं, थोडं आहार सांभाळला तर हृदय लांबपर्यंत टणक राहतं.

चला तर मग पाहूया, हृदय निरोगी ठेवणारे 8 आहाराचे नियम.

ताजं आणि घरचं खा

बाजारात मिळणारे पॅकेटमधले पदार्थ,ते खायला भारी वाटतात खरं आहे, पण आतून मात्र अंगावर फार मोठं ओझं टाकतात. त्यात काय असतं तर जास्त मीठ, तेल, साखर आणि वेगवेगळी chemicals असतात.

ह्या गोष्टी रोज पोटात गेल्या की रक्त घट्ट होतं, धडधड वेगळीच होते आणि हृदयावर ताण वाढतो.

त्यापेक्षा आपल्याकडचं जुनं परंपरागत जेवण काय वाईट आहे का? सकाळी गरमागरम भाकरी, मस्त भाजी, थोडं कडधान्य, ताकाचं एक ग्लास आणि दह्याचा बेत बस्स, एवढं पुरेसं आहे. हे सगळं साधं पण पौष्टिक आहे. यामुळे हृदयाला चालायला लागणारी ताकद मिळते आणि पचनही सुरळीत राहतं.

लक्षात ठेवा, पॅकेटवरचं आकर्षण टाळा आणि घरचं ताजं जेवण हाच हृदयाचा tonic आहे.

हे पण वाचा: हिरव्या भाज्या खाल्ल्याचे 10 जबरदस्त फायदे

जास्त तेलकट टाळा

आता बघा, लोणी, तूप, समोसा, वडे-पक्वान्नं हे सगळं खायला भारी लागतं. पण रोजच जर हे पोटात टाकलं तर हृदयाची वाट लागते.

Saturated fat नावाचं एक संकट त्यातून पोटात जातं आणि मग रक्तवाहिन्या जाडसर होतात. रक्त नीट वाहत नाही, हृदय जास्त धडधडतं आणि आजाराचं बीज रुजायला लागतं.

काय करायचं तर? अधूनमधून चालेल हो, एखादा रविवार असला की पाटराणी करून घेतली तरी चालते. पण रोजचं जेवण साधं ठेवा. भाज्या, डाळी, सलाड यावर भर द्या. तेलात जास्त बुडबुडे काढलेलं खाल्लं की मग उरलेल्या दिवशी हलकंफुलकं खा.

हृदयाला जर भार देऊ नये असं वाटत असेल तर तेलकटावर ताबा ठेवायलाच हवा.

भाज्या आणि फळं वाढवा

भाज्या आणि फळं खाणे हे तर अगदी हृदयासाठी सोनं आहे. भाज्या आणि फळं म्हणजे हृदयासाठी खजिनाच आहेत. त्यात काय असतं? तर vitamin, mineral आणि fiber. हे तिन्ही हृदयाला टणक ठेवायला फार कामी येतात.

हिरव्या भाज्या,पालक, मेथी, शेवग्याची पानं; मोसमी फळं, पेरू, सफरचंद, संत्रं, पपई; आणि सलाडमध्ये काकडी, गाजर, टोमॅटो; याशिवाय अंकुरलेलं मूग, चणे… हे सगळं पोटात गेलं की शरीराला ऊर्जा मिळते पण हृदयावर अजिबात भार पडत नाही.

म्हणजे पोट भरलं तरी जडपणा नाही, उलट हलकंफुलकं वाटतं. हृदय आपलं नीट काम करत राहतं.

मिठावर कंट्रोल ठेवा

मीठ हे खरं तर अन्नाची चव वाढवायला असतं, पण ते जास्त झालं की त्याचा उलट परिणाम होतो. जसं आपण एखाद्या भाजीत मीठ जास्त टाकलं तर ती भाजीच खायची राहात नाही, तसंच शरीरात जास्त मीठ गेलं तर हृदयाची अवस्था बिघडते.

मीठामुळे रक्तदाब (blood pressure) वाढतो. रक्तदाब वाढला की रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि ते थेट हृदयाला झेलावं लागतं. आपल्याला कळत-नकळत रोजच्या खाण्यातून मीठ जास्त होतं. लोणचं, पापड, बिस्किटं, पॅकेट स्नॅक्स यामध्ये मीठ प्रचंड प्रमाणात असतं.

म्हणून काय करायचं? घरात रोजच्या स्वयंपाकात मीठ थोडं कमी टाका. जेवताना हाताने वरून मीठ भुरभुरवायची सवय असेल तर लगेच बंद करा. असं केलं की काही दिवसात जीभही सरावते आणि हृदयाची धडधड एकदम सुरळीत होते.

हे पण वाचा: छोट्या छोट्या सवयी बदलून आयुष्य कसं बदलता येतं?

मासे, ड्रायफ्रूट्स, डाळी हे प्रोटीनचे खजिने देखील घ्या

हृदय निरोगी ठेवायचं असेल तर शरीराला ताकद देणारे पोषक घटक हवेच. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रोटीन. प्रोटीन हृदयाची आणि स्नायूंची ताकद वाढवतं.

आपल्याकडे मासे हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. विशेषतः सार्डिन, मॅक्रेल असे छोटे मासे हृदयासाठी सोनं आहेत. याशिवाय अक्रोड, बदाम, काजू यासारखी ड्रायफ्रूट्स, डाळी, मूग, चणा हे पण प्रोटीन देतात.

हे पदार्थ खाल्ले की रक्तवाहिन्या मोकळ्या राहतात, cholesterol कमी होतं. म्हणजे रक्ताचा प्रवाह नीट होतो, हृदयावर ताण कमी होतो आणि आपलं इंजिन (हृदय) सुरळीत चालतं.

गोड खाणं मर्यादेत ठेवा

गोड कुणाला आवडत नाही? एखादा लाडू, जलेबी, गुलाबजाम किंवा soft drink पोटात गेला की आपल्याला भारी वाटतं. पण हे रोजचं झालं तर मात्र फार धोकादायक ठरतं.

जास्त गोड खाल्लं की वजन वाढतं, पोटावर चरबी बसते. त्यातून diabetes येतो आणि diabetes आला की हृदयाचे आजार दार ठोठावतात. रोजचं केक, बिस्किटं, मिठाई, थंड पेय हे काही उपयोगाचं नाही.

गोड खायचंच असेल तर नैसर्गिक गोड पदार्थ निवडा. फळं, खजूर, मनुका, मध. हे शरीराला पण फायदेशीर आहेत आणि हृदयावर भारही टाकत नाहीत.

पाणी पुरेसं प्या

आपलं शरीर म्हणजे एकदम शेतासारखं आहे. शेताला वेळेवर पाणी मिळालं नाही तर पीक वाळतं, तसंच शरीरालाही पाणी कमी पडलं की सगळ्या यंत्रणेत गडबड होते. रक्त म्हणजे आपल्या अंगातलं पाणीच समजा. ते नीट वाहत राहायला हवं.

आता पाणी कमी प्यायलं तर काय होतं? रक्त घट्टसर होतं, म्हणजे circulation मंदावतो. त्यातून हृदयाला रक्त ढकलायला जास्त ताकद लावावी लागते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी हृदयाला कसरत करावी लागते.

दिवसाला किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यायचं ठरवा. गरम हवामान असेल तर अजून जास्त घ्या. एकदम गटागटा प्यायचं नाही, तर थोडं थोडं करून दिवसभर पाणी प्या. यामुळे रक्तवाहिन्या खुल्या राहतात, शरीर थंड राहतं आणि हृदयाला काम करायला सोपं पडतं.

दारू, तंबाखू, सिगारेट पासून दूर रहा

हे तर हृदयाचे शत्रू क्रमांक एक! दारू, सिगारेट, तंबाखू ह्या तिघांनी कित्येक लोकांचं आयुष्य कमी केलं आहे.

धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या जाडसर होतात, त्यात निकोटीन नावाचं विष जातं. दारूमुळे हृदयाची गती विस्कटते, रक्तदाब वाढतो. तंबाखूमुळेही तसाच परिणाम होतो. ह्या तिघांमुळे हृदयाचं काम दुप्पट वाढतं.

म्हणजे जिथं हलक्या गाडीला सहज रस्ता चढायला हवा, तिथं आपण इंजिनावर जड ओझं टाकून चढायला लावत आहोत. मग इंजिन किती दिवस चालणार?

खरं तर हे तीन एकदम सोडून दिलं की हृदयाचं आयुष्य आपोआप वाढतं. अंग हलकं वाटतं, श्वास नीट लागतो आणि शरीरात वेगळीच ताजेतवानेपणा येतो.

निष्कर्ष:

हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही आलिशान डाएट, महागड्या गोळ्या, परदेशी supplements यांची अजिबात गरज नाही. आपल्या आजोळीत जसं साधं जेवण मिळायचं.. जसं कि,भाकरी, भाजी, डाळ, ताक, फळं तेच तर खरं हृदयाचं tonic आहे.

फक्त काही साधे नियम पाळायचे:

  • जास्त तेलकट, गोड, मीठ कमी करायचं
  • भाज्या, फळं, डाळी रोजच्या आहारात ठेवायच्या
  • पुरेसं पाणी प्यायचं
  • आणि दारू, सिगारेट, तंबाखू पूर्ण बंद करायचं

ह्या गोष्टी अंगात बसवल्या की हृदय बरंच वर्षं ठणठणीत राहील. धडधड नीट चालेल, रक्त व्यवस्थित वाहेल आणि तुम्ही सगळ्या कामांत उत्साही राहाल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुमचा अनुभव आणि सल्ला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती ही केवळ शैक्षणिक उद्देशाने आहे. आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

FAQ :

1. हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज काय खावं?

साधं घरचं जेवण. भाकरी, भाजी, डाळ, ताक, फळं. यामुळे हृदय हलकं आणि टणक राहतं.

2. हृदयासाठी कोणती फळं चांगली आहेत?

डाळिंब, सफरचंद, पपई, संत्रं, पेरू, द्राक्षं ही फळं रक्त स्वच्छ ठेवतात आणि हृदयाला ताकद देतात.

3. तेलकट पदार्थ पूर्ण टाळावे का?

पूर्ण नाही, पण मर्यादेत. आठवड्यात एखाद्या दिवशी चालतील, पण रोजचे वडे-भजी, समोसे, चिकन-फ्राय खाल्ले तर हृदय त्रासायला लागतं.

4. मिठ किती खाल्लं तर सुरक्षित आहे?

WHO चं म्हणणं आहे की दिवसाला ५ ग्रॅम (एक चमचा) मिठ पुरेसं आहे. त्यापेक्षा जास्त झालं की रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो.

5. गोड आवडतंय, काय करू?

नैसर्गिक गोड खा. फळं, खजूर, मध. रोज रोज केक, बिस्किटं, मिठाई, थंड पेय घेतलं तर वजन आणि diabetes दोन्ही वाढतात.

6. प्रोटीनसाठी शाकाहारी लोकांनी काय खावं?

डाळी, मूग, चणे, राजमा, हरभरा, अक्रोड, बदाम हे उत्तम प्रोटीनचे स्रोत आहेत. मासे न खाल्लं तरी हृदयाला ताकद मिळते.

7. दारू-सिगारेट थोड्या प्रमाणात चालतील का?

नाही. अगदी थोडी दारू-सिगारेट घेतली तरी हृदयावर वाईट परिणाम होतो. हे पूर्ण सोडलं तरच हृदयाचं आयुष्य वाढतं.

हे पण वाचा: शरीरातील रक्त वाढवणारी ही आहेत टॉप 10 फळं

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Sharing Is Caring:

मी कोण आहे?तर मी गेल्या काही वर्षापासून स्वतःवर काम करत आहे.स्व-उन्नती(Self Improvement), सकारात्मक विचार, वेळेचं व्यवस्थापन, यशस्वी सवयी आणि शांत मन या गोष्टी मी स्वतः अनुभवून शिकल्या आहेत. या प्रवासात जे काही मला उपयोगी वाटलं, जे खरंच तुमच आयुष्य बदलेल. तेच मी इथं लिहतो.माझं एकच उद्दिष्ट आहे कि, "सोप्या शब्दात प्रेरणा देणं आणि लोकांच्या आयुष्यात छोटा का होईना, पण सकारात्मक बदल घडवणं." माझे लेख अनुभव, अभ्यास आणि रोजच्या जीवनात वापरता येतील अशा सवयींवर आधारित असतात. माझा विश्वास आहे कि,प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्याची एक संधी असतो.

Leave a Comment

Verified by MonsterInsights